Maharashtra College Reopen: शैक्षणिक वर्ष 1 नोव्हेंबरला तर कॉलेज दिवाळीनंतर सुरु, उदय सामंतांची माहिती Maharashtra College Reopen: The academic year starts on November 1 and the college starts after Diwali, according to Uday Samant

admin | 2021-10-01
Click here to join Our whatsapp group

Maharashtra College Reopen: शैक्षणिक वर्ष 1 नोव्हेंबरला तर कॉलेज दिवाळीनंतर सुरु, उदय सामंतांची माहिती

लॉकडाऊन करण्यात आल्यापासून ऑफलाईन पद्धतीनं कॉलेज सुरु झालेली नाहीत. महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी कॉलेज कधी सुरु होणार यासंदर्भात माहिती दिली आहे.

कोरोना विषाणू संसर्गाचा भारतात शिरकाव झाल्यानंतर गेल्यावर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन करण्यात आलं. लॉकडाऊन करण्यात आल्यापासून offfline College  सुरु झालेली नाहीत. महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी कॉलेज कधी सुरु होणार यासंदर्भात माहिती दिली आहे. यंदाचं शैक्षणिक वर्षा 1 नोव्हेंबरपासून सुरु होईल. मात्र, प्रत्यक्षात कॉलेज दिवाळीनंतर सुरु होतील, असं सामंत म्हणाले.

कॉलेज सुरु करण्यासाठी एसओपी बनवणार

अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक झाली आहे. कॉलेज सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊले टाकत आहोत. प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेवून निर्णय होईल, असं उदय सामंत म्हणाले. टास्क फोर्ससोबत चर्चा करून एसओपी बनवली जाईल व मुख्यमंत्र्यांच्या संमतीनंतर निर्णय होईल, असं उदय सामंत म्हणाले.

दिवाळीनंतर फिजिकल कॉलेज सुरु

1 नोव्हेंपासून शैक्षणिक वर्ष होईल. परंतु तेव्हाच दिवाळी असल्यानं कदाचित दिवाळीनंतर शैक्षणिक वर्ष सुरू होईल.तेव्हाच फिजिकल कॉलेज सुरू करण्याचा विचार करतोय, असं उदय सामंत म्हणाले.

दिवाळीनंतर फिजिकल कॉलेज सुरु

1 नोव्हेंपासून शैक्षणिक वर्ष होईल. परंतु तेव्हाच दिवाळी असल्यानं कदाचित दिवाळीनंतर शैक्षणिक वर्ष सुरू होईल.तेव्हाच फिजिकल कॉलेज सुरू करण्याचा विचार करतोय, असं उदय सामंत म्हणाले.

उपस्थितीची सक्ती नसेल

महाविद्यालय सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी यायचे की नाही हे त्यांनी ठरवावे. उपस्थित राहण्यासाठी विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारची सक्ती केली जाणार नाही, असं उदय सामंत म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनंतरच महाविद्यालय सुरु

उदय सामंत यांनी कॉलेज सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील असं म्हटलं आहे. कोरोना कमी झालेला आहे, तिथं कॉलेज सुरू करायला काहीच अर्थ नाही. पण याकरीता मुख्यमंत्र्यांची परवानगी लागेल, असं सामंत म्हणाले.

प्राध्यापक व प्राचार्य भरतीला तत्वत: मान्यता

राज्यातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राचार्य भरतीला तत्वत: मान्यता मिळालीय. सोमवारी किंवा मंगळवारी प्राध्यापक भरतीची फाईल अर्थ विभागाकडे जाईल. राज्यात 3074 प्राध्यापकांच्या जागा रिकाम्या आहेत. सीएचबी तत्वावर प्राध्यापकांनाही चांगले मानधन मिळेल याचाही विचार करतोय.

पावसामुळं सीईटी परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा 9 आणि 10 ऑक्टोबरला

गुलाब चक्रीवादळामुळं मराठवाड्यात मुसळधार पावसानं दाणादाण उडवली. मराठवाड्यातील शेतीचं नुकसान तर झालंच होतं. तर, औरंगाबाद आणि नांदेडमधील  विद्यार्थी देखील पूरस्थितीमुळं परीक्षेला मुकले होते. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सकाळी सीईटी परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देत पुन्हा परीक्षा घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. आता उदय सामंत यांनी परीक्षेच्या तारखा जाहीर करुन शब्द पाळला आहे. 9 आणि 10 तारखेला सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे.

महाराष्ट्रात विदर्भ , मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकणात पाऊस वाढत आहे. मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्याने हजारो विद्यार्थ्यांची सीइटी होऊ शकली नाही कोरोना, पूर परिस्थिती , घरात वाईट घटना घडली असेल तर परत परीक्षा देत येईल. तांत्रिक अडचणी असतील तरी परीक्षा पुन्हा घेण्यात येतील. विद्यार्थ्यांना डेंग्यू मलेरिया झाला असल्याने परीक्षा देता येणार नसेल तर त्याची परीक्षा परत देता येणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे उद्या नवी जाहीर सूचना काढली जाईल. हॉल तिकीट , सेंटर पहिल्या परीक्षेचे वापरता येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यंच्या निर्देशानुसार 9 आणि 10 तारखेला सीईटी घेतली जाईल, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

Maharashtra College Reopen: The academic year starts on November 1 and the college starts after Diwali, according to Uday Samant
Colleges have not started offline since the lockdown. Maharashtra Higher and Technical Education Minister Uday Samant has given information about when the college will start.

Mumbai: The corona virus was locked down in March last year after it spread to India. Colleges have not started offline since the lockdown. Maharashtra Higher and Technical Education Minister Uday Samant has given information about when the college will start. This year's academic year will start from November 1. However, the colleges will actually start after Diwali, Samant said.

Will make SOP to start college

A meeting of the Vice-Chancellors of non-agricultural universities has been held. We are taking positive steps towards starting a college. The decision will be taken after reviewing the situation in each district, said Uday Samant. The SOP will be formed in consultation with the task force and a decision will be taken after the consent of the Chief Minister, said Uday Samant.

Physical college started after Diwali

Attendance will not be compulsory
Students should decide whether to come after college or not. Students will not be forced to attend, said Uday Samant.

The college started only after the permission of the Chief Minister

Uday Samant has said that the decision to start the college will be taken by Chief Minister Uddhav Thackeray. Corona is down, there is no point in starting college. But for this, the permission of the Chief Minister will be required, said Samant.

Content Source : Etv9 

Click here to join whatsapp group
Click here to join Telegram channel

Share This content :

Free Certification Course by ISRO

Read Details

TCS कडून १५ दिवसांचा डिजिटल सर्टिफिकेट कोर्स, मिळेल नोकरीची हमी, With the Package of 4 Lakhs Per Anuum 15 days digital certificate course from TCS, job guarantee

Read Details

Free Microsoft Azure Certification for Students

Read Details